
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान केले आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआय चौकशीची करण्यात आली. त्यावर हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की ” ही छापे मारी ही भाजप च्या सांगण्यावरून करण्यात आली आहे”. या वक्तव्यावरून चांगले राजकारण पेटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की ” परमवीर सिंग या आरोपीच्या पत्रावर सुशांत सिंग राजपूत प्रकरणी काही कारवाई नाही, अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी ठोस कारवाई नाही, या सर्व प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा फेल गेल्या आहेत, असा आरोप ना.परमवीर सिंग आरोप करतात, दिल्ली येथे वरिष्ठ यंत्रणांची भेट घेतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सचिव यांची रातोरात भेट घेतात, त्यानंतर लगेच एन आय ए कडे तपास जातो, याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
इतकेच नाही तर अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याची जिल्हा न्यायालयात चौकशी सुरू आहे.