
माविआ सरकारच्या विरोधात २० हजार सभा घेणार – चंद्रकांत पाटील
महाविकासआघाडी सरकारच्या कारकीर्दीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरूद्ध जनजागृती करण्यासाठी राज्यभरात २०,००० जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.
मुंबईत झालेल्या बैठकीत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि “सत्ताधारी पक्षांच्या राजकीय पाश्र्वभूमीवर वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांचा निषेध नोंदविण्याचा” निर्णय घेण्यात आला आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून मोर्चाला सुरुवात होनार आहे.
माध्यमांना संबोधित करताना पाटील म्हणाले की, “२०,००० मोर्चे काढण्यासाठी पक्ष २०,००० पथके तैनात करणार आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासाठी जबाबदार असणाऱ्या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी लोकांना सांगणे याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ”
महाविकासआघाडीच्या राजवटीत गुन्हेगार मोकळेपणाने फिरत आहेत. कायद्याची काही भीती नाही.तसेच पुण्यात आत्महत्या करून मृत्यू झालेल्या तरूण पूजा चव्हाण यांच्या शोषणाशी संबंधित असो वा महाराष्ट्रात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना असोत किंवा मनसुख हिरेनचा रहस्यमय मृत्यू, महाराष्ट्रात असे भयंकर गुन्हे घडले आहेत.